आपल्याकडे आठराव्या शतकाच्या प्रारंभी ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने पहिलेच पाऊल टाकले. काही वर्षातच ते पाऊल भक्कम रोवले गेले. आणि १५० वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तद्नंतर भारत स्वतंत्र झाला.भारतातून इंग्रज निघून गेल्यानंतर या स्वतंत्र देशाचा कारभार चालवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष, ११ महीने, १८ दिवस अहोरात्र मेहनत करून या भारत देशाचे ‘संविधान’ लिहिले. या संविधानामुळे लोकशाहीला महत्त्व आले आणि प्रत्येकाला आपले हक्क आणि अधिकार मिळाले. जो तो व्यापार करू लागला. उद्योग धंद्यात आपला जम बसवू लागला. हळूहळू भारतात भारतीय सरकारच्या माध्यमातून उद्योग धंदे, व्यवसाय, स्वत:च्या कंपन्या निर्माण होऊ लागल्या. असा हा बदल केवळ एका दिवसात अथवा एका रात्रीत झालेला नसून त्यासाठी महामानवांना अतोनात परिश्रम घ्यावे लागले.
Pandey et al. (Sun,) studied this question.