गेल्या अनेक शतकांपासून महाराष्ट्राच्या धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत कीर्तनपरंपरेचे मोलाचे योगदान आहे. कीर्तनाच्या माध्यमातून विविध साधुसंतांनी, समाजप्रबोधकांनी मौखिक पद्धतीने समाजाचे प्रबोधन करून समाजावर उत्तम जीवनमूल्यांचे संस्कार केले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील खेडे, सार्वजनिक ठिकाणे, देवळे या ठिकाणी धार्मिक उद्देशाने अशी कीर्तने होत आली आहेत. कीर्तन ही एक प्राचीन परंपरा आहे. संत नामदेव, संत तुकाराम यांपासून सुरू झालेल्या कीर्तन परंपरेचा वारसा आधुनिक महाराष्ट्रातील विविध साधुसंत, समाज प्रबोधनकार यांनी यशस्वीपणे पुढे सुरू ठेवला आहे. कीर्तन हे केवळ धार्मिक नाही तर ते मनोरंजक देखील असते. यातून लोकांना आनंद मिळतो आणि त्यांचे प्रबोधनही होते.कीर्तन या लोककलेचा ग्रामीण समाजावर ज्याप्रमाणे नैतिक परिणाम झाला, त्याचबरोबर कीर्तन परंपरेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे खोलवर परिणाम झालेला दिसून येतो. कीर्तनामुळे ग्रामीण भागातील कलाकारांना आणि संबंधित व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन मिळते. कीर्तनकार, गायक, वादक (तबला, हार्मोनियम) आणि इतर सहाय्यक कलाकारांना त्यांच्या कलेतून पैसे मिळतात. त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. या कलाकारांना उत्पन्नाचे साधन प्राप्त होते.
Divate et al. (Sun,) studied this question.
Synapse has enriched 5 closely related papers on similar clinical questions. Consider them for comparative context: